
मुंबई आणि दिल्ली विमानतळ हे अतितीव्रतेचे विमानतळ असून, येथे ताशी ४६ उड्डाणे होतात. विमाने आणि प्रवाशांचे सुरक्षित आगमन आणि प्रस्थान राखण्याची जबाबदारी एटीसीओवर असते. व्हायरल व्हिडिओमध्ये व्हिजिबिलिटी चांगली दिसत आहे. एटीसी गिल्ड इंडियाचे सरचिटणीस आलोक यादव यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.