Monsoon Update : गणेशोत्सव वरुणराजाला घेवून येणार; महाराष्ट्रात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा

0
15
Monsoon Update : गणेशोत्सव वरुणराजाला घेवून येणार; महाराष्ट्रात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा


हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि कोकणातील ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना नारंगी अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे. येत्या २० सप्टेंबरपर्यंत या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा, गडचिरोली आणि जळगाव या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.



Source link