
इतकेच नाही तर हवामान विभागाने लू चा सामना करत असलेल्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. हवामान विभागाने म्हटले की, ३० मे नंतर उष्णतेची लाट कमी होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या एक आठवड्यात काही राज्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर सिक्किम आणि बंगालमध्येही हवामानात बदल होईल. गुरुवारीपासून वातावरणात बदल होऊन येत्या ५ दिवसात पाऊस सुरू होऊ शकतो.