
भागवत म्हणाले, मणीपुर हे जवळपास दशकभर शांत होते. मात्र, या ठिकाणी अचानक हिंसाचार हा कसा उफाळून आला? या मागे कुणाचा हात आहे? सीमेपलीकडील अतिरेकीही या मागे होते का? आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाजाच्या संघर्षाला जातीय तसेच धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का केला जात आहे ? देशात उद्भवलेली ही दुर्दैवी परिस्थिती सोडवण्यासाठी व्यापक प्रयत्न आज गरजेचे आहे. या साठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता गरजेची आहे, असे भागवत म्हणाले.






