
एकाने लिहिले की, ‘आम्हाला मुन्ना भैय्याची खूप आठवण आली, यात दमदार संवादही नाहीत.’ आणखी एक जण लिहितो की, ‘मिर्झापूरचा पहिला आणि दुसरा सीझन खूप चांगला होता, पण तिसरा सीझन खूपच बोरिंग वाटत आहे. यात काही आशय नाही आणि कथाही नाही, हा खूप कंटाळवाणा सीझन आहे.’ एका युजरने लिहिले की, ‘यावेळी कालीन भैय्याची जादू फिकी पडली आहे. पण गुड्डू भैय्याचा भैय्याचा भौकाल दिसला आहे.’ अनेक नेटकऱ्यांनी गुड्डू भैय्याचं कौतुक केलं आहे.