
त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आंध्रप्रदेशातील एका मालवाहू ट्रकने त्यांच्या ट्रॅकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात निलाबाई परशुराम ऐवळे, शालन दत्तात्रय खांडेकर, आप्पा ऐवळे, जगमा तम्मा हेगडे यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील तीनजण चिखलगीचे आहेत. एकजण शिरनांदगीचा रहिवासी आहे. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ व मिरज येथील दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.



