
मी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला, हे जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि म्हणूनच मी माझी भूमिका आपल्या समोर मांडत आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वर्षे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर मी काही धाडसी सुधारणांची तसेच त्यांच्या परिणामांना उत्तरदायी राहण्याची सूचना केली. २०१९ मध्ये मतदानाच्या फक्त १ महिना आधी नेमणूक झाली. मी निवडणुकीतील पराभवाचे संपूर्ण दायित्व स्वीकारले आणि माझ्या पदाचा राजीनामा दिला. मला असे वाटते की मी जेव्हा दायित्व स्वीकारले होते, तेव्हाच पक्षात घडलेल्या घटनांबाबत जाब विचारण्याचा अधिकारही माझ्याकडे आपोआपच आला”, असे मिलिंद देवरा म्हणाले.






