जळगावचा सागर आणि दिव्येश, कल्याणचा झीरो डिग्री क्रू ग्रुप, कराडचा डी टू डी क्वीन्स ग्रुप, पुण्याची श्रीमयी सूर्यवंशी आणि पिंपरीच्या सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्यात या अंतिम ५ स्पर्धकांना प्रवाह परिवारातल्या ५ नायिकांची साथ मिळणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी, रंग माझा वेगळाची दीपा, शुभविवाह मालिकेतली भूमी, लग्नाची बेडीमधील सिंधू आणि मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आनंदी या महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांसोबत ताल धरणार आहेत.







