
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आज मुंबईत जालन्यातील अंबड तालुक्यातील एका कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे. सुनील बाबुराव कावळे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्येनंतर मराठा नेते आक्रमक झाले असून राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचा इशारा दिला आहे. सरकारकडून कावळे यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे. सरकारच्या वतीने मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले की, सुनिल कावळे यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत दिली जाईल, तसेच कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा केसरकर यांनी केली.






