
प्रकाश शेंडगे म्हणाले की, सरकारच्या आदेशाचीआम्ही होळी करू. याविरोधात राज्यभर आक्रोश आंदोलनकेले जाईल, तसेच ओबीसींसाठी नवा पक्ष उभारू, असं प्रकाश शेंडगे म्हणाले. सरकारने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिलं आहे. राज्यातील १०० टक्के मराठा समाजाला कुणबी दाखले देऊनत्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जरांगे पाटील आणि सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. मात्र यात खरंच मराठा समाजाचा फायदा की तोटा? हे लवकरच स्पष्ट होईल.जो कुणबी दाखला घेईल तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा स्वत:ला ९६ कुळी मराठा म्हणू शकत नाही. कुणबी दाखल्याने राज्यातील मराठ्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे आता कुणबी तेतुका मेळवावा असं म्हणावं लागेल.







