
माझ्याकडे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण यावरचा उपाय आहे. मात्र हा उपाय मी सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही, ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे हा उपाय मी नव्या सत्ताधाऱ्यांना सांगेन.आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळायचा ते मी त्यांना सांगेन. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते कसं द्यायचं हे मी नव्या सरकारला जरुर सांगेन मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांना सांगणार नाही. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहं.





