
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी वाशीकडे रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे,खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या शिष्ट मंडळाकडून नवीन अध्यादेश आणि इतर मागण्यांसंदर्भात झालेल्या चर्चेचा तपशील जरागेंना दिला जाणार आहे.






