
मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाची विनंती मान्य करत सरकारला १३ जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं, शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला आहे, असे शंभुराज देसाई यांनी सांगितलं. यावर जर सरकारने एक महिन्याच्या आत मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. या सोबतच त्यांचे नाव सांगून ज्यांनी पैसे लाटले त्याची मला यादी द्या, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाकडे केली. ज्या माणसाने १०० कोटी घेतले, त्या व्यक्तीचे नाव माहिती असून वेळ आल्यावर हे नाव जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.







