
Manoj Jarange Patil Health Condition : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागून घेतला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ देत आमरण उपोषण सोडलं आहे. परंतु साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. परंतु आता आमरण उपोषण सोडताच मनोज जरांगे पाटील यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे.





