
जरांगे म्हणाले, मोदी-शहांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत, महाराष्ट्रात सर्वात मोठी जात असलेली मराठा जात त्यांना संपवायचीय. गुजरातमध्ये पटेल आहे, यादव, गुज्जर, जाट, मुसलमान, दलित या मोठ्या जाती त्यांना संपवायच्या आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. मोठ्या जाती जर एकत्र आल्या तर काय होतं हे त्यांना समजलं असल्याचा टोलाही जरांगे यांनी लगावला.