
मजोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारचे शिष्टमंडळ फक्त तारीख पे तारीख देत आहे. त्यामुळे आता सरकारमधील काही मंत्र्यांना थेट फोन करून याबाबत जाब विचारणार आहे. आता यांना टाईम बॉन्ड देणार नाही तर थेट शेवटचं विचारणार आहे. राज्यात आतापर्यंत २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. १८०५ पासून १९६७ पर्यंत आणि सगळे पुरावे शोधण्याचे काम सुरू असून ओबीसी प्रवर्गत मराठे असल्याचे देखील समोर आले आहे. ७० वर्षांपासून मराठ्यांचे कुणी वाटोळं केले याचे उत्तर आता द्यायला हवे, असे देखील जरांगे पाटील म्हणाले.






