
पाडायचे की निवडून आणायचे २९ ऑगस्टला ठरवणार –
जरांगे म्हणाले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण ही आपली भूमिका आहे. कोणी जरी आडवा आला तरी आम्हाला कुणी थांबवू शकत नाही. २९ ऑगस्ट रोजी पाडायचे का निवडून आणायचे ठरवणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अंतरवलीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केले की, निवडणूक आल्यावर भावनिक होवू नका. आरक्षण नसल्याने मराठा लोक व विद्यार्थी मोठे होत नाहीत, असे बोंबलू नका.







