
झी मराठी वाहिनीवरील सर्वांची आवडती मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ.’ या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, मायरा वायकुळ, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.








