
Maharashtra Weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. तापमानात मोठी वाढ होत आहे. पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात उष्णतेची लाट तर विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात, मुंबई, ठाणे, रायगड तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, बीड येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यात मालेगाव सर्वाधित उष्ण ठरले. येथे सर्वाधिक ४३.८ तर अकोला येथे ४३. ३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा