
मिचोंग चक्रीवादळामुळे राज्यात काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. तर काही ठिकाणी गरपीट देखील झाली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, आता राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअस तापमानात घटल्याने अनेक ठिकाणी सकाळी धुके आणि थंडी तर रात्री देखील गुलाबी थंडीचा अनुभव नागरीक घेत आहेत.




