
Maharashtra Weather Update : राज्यात मे महिन्यात सूर्य आग ओकणार आहे. पुढील काही दिवस राज्यात काही भागात तापमानात मोठी वाढ होणार आहे. तर काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ४, ५, ६ मे दरम्यान, कोकणात आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रायगड व रत्नागिरी, सांगली, सोलापूर येथे ४ आणि ५ मे रोजी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ व ४ मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसोबत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा




