
Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील ९ तारखेपर्यंत काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना देखील पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
ट्रेंडिंग न्यूज