
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता वाढत असल्याने तापमानात घट झाली आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने ही घट झाली आहे. त्यात राज्यावर चक्राकार वारे देखील सक्रिय झाले असून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात किमान तापमानात १-२ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांनत राज्यातील तापमान आणखी घट होणार असून ३-४ अंशांनी किमान तापमानात कमी होण्याची शक्यता हे.