
Maharashtra Weather Update : राज्यात बुधवारी पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्ममळून पडली. दरम्यान, आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या रायगड, रत्नागिरी, धुळे जळगाव, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ५० ते ६० किमी प्रतीतास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेचे लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.





