
Maharashtra weather news update : राज्यात किमान तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. थंडीची चाहूल लागली असून पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. बुधवारी पुण्यात आणि मुंबईत हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. मुंबईत किमान १९.४ अंश सेल्सियस इतके तापमान होते. तर पुण्यात १५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.






