विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. या पावसाचा फटका तूर, कापूस, सोयाबीन या पिकांना झाला. आज देखील विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





