Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज देखील राज्याच्या काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळीवाऱ्यासह पवसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर मात्र, राज्यात पुन्हा तापमानात वाढ होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली या तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांना आज हवमान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा




