
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वहात असून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनानंतर लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष रणनिती आखत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहेत. त्यातच मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवारांच्या लोकसभा उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.





