
वर्षावरील बैठकीत आमदारांची नाराजी –
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील मंत्री व आमदारांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मित्रपक्षाविषयी तक्रार करण्यात आली. अनेक जागांवर पाणी सोडावे लागल्यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली. शिरुर मतदारसंघ सोडला मात्र नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये, अशी मागणी आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली.





