बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटले की, परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. पक्ष फुटला. त्यानंतर काही कारणास्तव, काही लोकांच्या सांगण्यावरून मीही दोन महिन्यानंतर त्यांच्यासोबत गेलो. मात्र मी इतकेच सांगेन की, मी माझ्या आयुष्यात अशी अनेक माणसं बघितली आहेत, जे शरद पवारांना सोडून गेले, ते विधान भवन परिसरात कधी दिसले नाहीत. सर्व शून्य झाले. मला शून्य व्हायचं नाही.