
शिवराज राक्षे याने ६५ वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत मानाची गदा पटकावली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये पार पडला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये ६-० अशा फरकाने शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीची गदा दुसऱ्यांदा उंचावली.





