
मुंबई उपनगरांत किती झाले मतदान?
मुंबई उपनगरातील बोरिवली विभागात ४५.३८ टक्के मतदान झाले आहे. तर, भांडुप पश्चिम विभागात ४८.८२ टक्के मतदान झाले आहे. उपनगरातील सर्वाधिक मतदान झालेल्या भागांमध्ये भांडुप आणि बोरिवली अग्रक्रमी आहेत. इतर भागांमध्ये दहिसर ४१.९४ टक्के, मागाठाणे ४०.२ टक्के,मुलुंड ३९.१ टक्के, विक्रोळी ४१.५ टक्के, भांडुप पश्चिम ४८.८२टक्के, जोगेश्वरी पूर्व ४५.५६ टक्के, दिंडोशी ४३.७८ टक्के, कांदिवली पूर्व ४१.८५ टक्के,चारकोप ३९.७ टक्के, मालाड पश्चिम ४१.१४ टक्के,गोरेगाव ४२.५९ टक्कर, वर्सोवा ३७.८४ टक्के, अंधेरी पश्चिम ४०.८६ टक्के,अंधेरी पूर्व ४२.६३ टक्के,विलेपार्ले ४३.८३ टक्के, चांदीवली ३१.८५ टक्के, घाटकोपर पश्चिम ४५.२३ टक्के,घाटकोपर पूर्व ४३.८५ टक्के, मानखुर्द शिवाजीनगर ३६.४२ टक्के,अणुशक्ती नगर ३८.६२ टक्के, चेंबूर ४०.७६ टक्के, कुर्ला ३८.८२ टक्के, कलिना ३९.०८ टक्के, वांद्रे पूर्व ३६.९३ टक्के, वांद्रे पश्चिम ३९.४९ टक्के इतके मतदान झाले आहे.