
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘सत्ताधारी भाजपला केवळ २२० जागा मिळतील. ते सत्तेतून बाहेर फेकले जातील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळून एकूण २३५ जागा मिळतील’, असं केजरीवाल म्हणाले. ‘इंडिया आघाडीला २९५+ जागा मिळतील. भाजपला २२० तर एनडीए आघाडीला २३५ जागा मिळतील. ’इंडिया’ आघाडी स्वबळावर मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन करेल.’ असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. ‘इंडिया’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ४ जूननंतर निश्चित करण्यात येईल, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.







