
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या वैशालीत जमिनीच्या वादातून दोन गटात (Land Dispute) जोरदार भांडण झाल्याची घटना घडली. या दोन्ही गटाचा वाद इतका टोकाला गेला की, एका गटाने दुसऱ्या गटातील पाच जणांना ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडली.
पाटणा : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या वैशालीत जमिनीच्या वादातून दोन गटात (Land Dispute) जोरदार भांडण झाल्याची घटना घडली. या दोन्ही गटाचा वाद इतका टोकाला गेला की, एका गटाने दुसऱ्या गटातील पाच जणांना ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वैशालीतील कर्मापूर येथे शेत जमिनीच्या तुकड्यावरून दोन गटाचा वाद टोकाला पोहोचला. शेत जमिनीच्या तुकड्यावरून सुरु झालेल्या वादात दोन्ही गटाचे लोक आमनेसामने आले. दोन्ही गटातील लोक या लाठीकाठीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. तर या वादात एका गटातील व्यक्तीने दुसऱ्या गटातील लोकांना ट्रॅक्टरने चिरडलं.










