
बाहेरून आलेल्या लोकांची व्यवस्था करण्यातच राज्य सरकारचा पैसा खर्च होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. परिणामी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या विकासासाठी योजना राबवता येत नाही, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना खरंतर आरक्षणाची गरजच नाही. नोकरीमध्ये महाराष्ट्रातील मुला-मुलींना प्राधान्य द्यावा. नोकऱ्या उरल्या तर बाहेरच्या राज्यातील तरुणांना बोलवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली.







