
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील मौजे कोपार्डे गावात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कृष्णा आणि स्वप्नील शेतात काम करत होते. यावेळी त्यांचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.