
किशोर अरुण पराते (नागपूर, महाराष्ट्र), सुनील महादेव काळे (वय २४, महाराष्ट्र), अनुराग बिश्त (तिलवाडा रुद्रप्रयाग), अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची नावे आहेत. केदारनाथ पायी मार्गाने प्रवास सुरूच आहे. पावसाच्या सतर्कतेनंतर प्रशासनाकडून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रविवारी सकाळी आपत्ती नियंत्रण कक्षाला अपघात झाल्याची माहिती मिळाली. केदारनाथ यात्रा मार्ग चिरबासाजवळील डोंगरावरून मातीचा ढिगारा आणि मोठमोठे दगड आल्याने काही यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबले गेले.