KBC 15: पोलिओमुक्त भारत अभियानासाठी का झाली अमिताभ बच्चन यांची निवड? ‘केबीसी’च्या मंचावर झाला खुलासा!

0
14
KBC 15: पोलिओमुक्त भारत अभियानासाठी का झाली अमिताभ बच्चन यांची निवड? ‘केबीसी’च्या मंचावर झाला खुलासा!


नेहमीप्रमाणेच यावेळीही ‘कौन बनेगा करोडपती सीझन १५’ मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खास किस्सा शेअर केला. अमिताभ बच्चन ‘केबीसी १५’च्या मंचावर नेहमीच त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि कामाबद्दलचे किस्से शेअर करत राहतात. यावेळी अमिताभ बच्चन यांनी ते भारताच्या पोलिओ मोहिमेत कसे आणि का सामील झाले, याचा किस्सा शेअर केला आहे. ‘पोलिओमुक्त भारत अभियाना’चा किस्सा सांगताना त्यांनी म्हटले की, की या मोहिमेच्या दिग्दर्शकाने त्यांना केवळ त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ इमेजमुळे यात सामील करून घेतले होते. कारण, त्यावेळी लोक त्यांच्या मुलांना पोलिओ लसीकरण करण्याची विनंती ऐकतच नव्हते.



Source link