
करण जोहर याने त्याच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला साईन केले होते, ज्यामध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री जान्हवी कपूर दिसणार होती. कार्तिकने या चित्रपटासाठी मोठी रक्कम मागितली होती आणि या स्क्रिप्टमध्ये देखील काही बदल करण्यास सांगितले होते, जे करण जोहरला अजिबात आवडले नाही, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकच्या बॅकआउटमुळे करणच्या चित्रपटाला तब्बल २० कोटींचे नुकसान झाले होते. मात्र, दोघांनी आता आपापसांतील वाद मिटवले आहेत.







