
पुढे कंगनाने पोस्टमध्ये लिहिले की, “कोटुंबिक कार्यक्रमापासून सुनेला आणि नातीला वंचित ठेवलेलं सर्वांनी पाहिलं आहे. फक्त पैसे आणि प्रमोशनसाठी लग्न केले आहे. वडिलांच्या दबावामुळे त्यांनी लग्न केले आहे. या लग्नामुळे अभिनेत्याला एक सिनेमा मिळाला आहे. पण आता दोघेही या फेक लग्नापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता अभिनेत्याने पत्नी आणि लेकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा भारत आहे. एकदा लग्न झाले की परिस्थिती बदलता येत नाही.”






