
कानडगाव हे गोदावरी खोऱ्यातील पुनर्वसित गाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावात अद्यापही एसटी बस येत नसल्याने ग्रामसभेत नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. याशिवाय गावातील ड्रेनेज, अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, शेतरस्ते आणि वीजेच्या प्रश्नावरूनही ग्रामस्थांनी ग्रामसेवक, सरपंचांना खडेबोल सुनावले. पुनर्वसित गाव असल्याने विविध विकासकामं होण्यास वेळ लागतो, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ग्रामसेवक विजय रावते यांनी म्हटलं आहे.






