
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की,” जितेंद्र, पवार साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही. मला वाटत नाही की, प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की, आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत. आम्ही मागेच सांगितलं आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. कृपयाअशा अफवांवर विश्वास ठेवू नका.”




