
मिळालेल्या माहितीनुसार, जामतारा आणि विद्यासागर रेल्वे स्थानकादरम्यान एका एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. यानंतर ट्रेनमध्ये खळबळ माजली होती. आगीची माहिती मिळताच रेल्वेमधील प्रवाशी घाईघाईने रेल्वेतून बाहेर पडत असताना त्यांना दुसऱ्या रुळावरून भरधाव वेगाने येणाऱ्या झाझा-आसनसोल रेल्वेने चिरडले. दुसऱ्या रुळावरून येणारी ट्रेन प्रवाशाना न दिसल्यामुळे ट्रेन जवळ येताच प्रवाशांचा पळापळ झाली. त्यात काही प्रवासी ट्रकवरच पडले. त्याना अक्षरश: कापतच रेल्वे पुढे गेली.








