
पुढे ते म्हणाले, “राहत इंदौरी, निदा फाजली आणि आता मुनव्वर राणा यांच्यासारख्या शायरांनी जगाचा निरोप घेतल्याने शायरीतली अदब हळूहळू लोप पावते आहे असे वाटू लागले आहे. त्यांच्या निधनामुळे आपले कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.” जावेद अख्तर यांनी मुन्नवर राणा यांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला. त्यांचा खांदा देतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.







