
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती; परंतु सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मात्र फासे पलटले आणि टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर आली आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी ८ षटकांत बिनबाद ४० धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली.
१७ षटकानंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता ८३ धावा आहेत. सध्या रोहित शर्मा (४६) आणि यशस्वी जैस्वाल (३७) क्रीजवर आहेत.
रोहित-यशस्वीची आक्रमक फलंदाजी
भारताने एकही विकेट न गमावता ४० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि अर्ध्या तासात एकही विकेट न गमावता ८२ धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा ४५ आणि यशस्वी जैस्वाल ३७ धावांसह खेळत आहेत. रोहित त्याचे कसोटीतील १७ वे अर्धशतकाच्या जवळ आहे.
रविवारी तिसऱ्या दिवशी सकाळी ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वपूर्ण ७६ धावांची भागीदारी करून इंग्लंडची आघाडी ४६ धावांपर्यंत कमी केली. त्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळून टीम इंडियाला ड्रायव्हिंग सीटवर आणून बसवले. भारताला विजयासाठी १९२ घावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता ४० धावा केल्या. सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक असून विजयासाठी टीम इंडियाला ११८ धावा करायच्या आहेत. (India vs England, 4th Test)