
India Alliance in Front Split : देशभरात भाजप विरोधात विरोधी पक्षांनी एकत्रित भूमिका घेतल्यानंतर आतापर्यंत इंडिया आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने ‘इंडिया’ आघाडीला एकच धक्का बसला आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडलीय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय










