
क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे. अशाप्रकारे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. पण टीम इंडियाच्या पराभवाचे दु:ख सर्वांनाच आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शाहरुखचे कौतुक केले आहे.








