
Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून जाळपोळीच्या घटनांमध्येही वाढ झाल्यानं अनेक शहरातील इंटरनेट सेवा, बससेवा बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण मिळत नसल्याने अनेक तरुण आपले आयुष्य संपवत आहेत. आता हिंगोलीतील नहाद गावातील २१ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे.






