
सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी आपल्यावरील आरोपांनंतरही राजीनामा का दिला नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी म्हणाले आहेत की, नवीन आणि गंभीर आरोप पाहता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची स्वत:हून दखल घेईल का? यासोबतच राहुल गांधींनी विचारले आहे की, गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, पंतप्रधान मोदी, सेबीच्या अध्यक्षा कीगौतम अदानी?