Heat Stroke | देशात वाढतोय उन्हाचा कडाका; 16 हजारपेक्षा जास्त जणांना उष्णाघात तर 60 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

0
1
Heat Stroke | देशात वाढतोय उन्हाचा कडाका; 16 हजारपेक्षा जास्त जणांना उष्णाघात तर 60 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)


heatwave

तापमानाचा पारा वाढल्याने येथे उष्माघाताच्या (Sun Stroke) प्रकारातही वाढ होत आहे. भारतात मार्चपासून 16 हजारांहून अधिक जणांना उष्माघाताचा त्रास झाला तर आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जयपूर : यंदाचा उन्हाळा मे महिन्यातील सर्व विक्रम मोडत आहे. राजस्थानमध्ये इतका भीषण उकाडा आहे की, इथल्या अनेक भागात 45 डिग्रीच्यावर तापमान गेले आहे. तापमानाचा पारा वाढल्याने येथे उष्माघाताच्या (Heat Stroke) प्रकारातही वाढ होत आहे. भारतात मार्चपासून 16 हजारांहून अधिक जणांना उष्माघाताचा त्रास झाला तर आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या 24 तासात राजस्थानच्या विविध भागात 12 हून अधिक लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात सूरजदान, सोनाराम, कमला देवी आणि पोपटराम यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याशिवाय बालोतरा रिफायनरीमध्ये दोन मजूर हीरसिंह आणि मूलाराम यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. बिकानेरच्या महाजन फायरिंग केंजमध्ये एका सैनिकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर भीलवाडा आणि जोधपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.






Source link